राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता…

Spread the love

पुणे- राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांत देखील मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात आज २६ जून ला, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ जून रोजी, रत्नागिरी रायगडला २८ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आज धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये व सातारा जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page