रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठी अतिमहत्त्वाची सुचना…

Spread the love

रत्नागिरी | 23 मे 2025- भारतीय हवामान विभागाकडून दिनांक 22.5.2025 रोजीच्या अंदाजानुसार  दिनांक 22 ते 26 मे दरम्यान जिल्ह्यात किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची  शक्यता आहे.

दिनांक  22 ते 26 मे  दरम्यान 45-50 किमी प्रतितास ते 55 किमी प्रतितास या वेगाने वारे वाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 23 मे  रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. 24 मे ते 26 मे दरम्यान  अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना  इशारा देण्यात येत आहे की त्यांनी समुद्रात जाऊ नये. आणि जे गेले आहेत त्यांनी किनाऱ्यावर 23 तारखेला परत यावेत.

*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी तर्फे जनहितार्थ*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page