
अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना , अनेक भागात व अनेक नागरिकांच्याही घरात पाणी शिरल्याने नुकसान….
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली असून, दिनांक 14 जून रोजी एकूण 484.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून येथे 119.87 मिमी पाऊस झाला आहे.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किणारपट्टीच्या भागात अनेक घरान्मध्ये पाणी भरल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे . भालावली नाटे बांधकर वाडी आदी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे .
राजापूर शहरातील जवाहर चौकात करंबेळकर यांच्या हॉटेलपर्यंत कोदवली नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली . पुराचे पाणी शहारात शिरण्याच्या शक्यतेने बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने सावधानतेचा पवित्रा घेतला होता .
राजापूर शहराकडुन राजापूर रोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरही पाणी भरल्याने काही काळ वाहतुक खोळंबली होती . प्रशासनाने या मार्गावरुन प्रवास न करण्याच्या सुचना दिल्या होत्या .
तालुक्यात अनेक ठिकाणी संरक्षक भिंतींसह रस्ते वाहुन गेले आहेत . तर अनेक ठिकाणी वीजवितरण कंपणीच्या वीजवाहीण्यांवर झाडे पडल्याने अनेक गावे अंधारात बुडाली आहेत . यामध्ये महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे . तर अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळुन पडल्याने अनेक गावातील वाहतुक बंद आहे .
आडिवरे येथील महाकाली मंदिराच्या परिसरातही पाणी भरले होते .
कोदवली राववाडी येथील पोलावरुन पाणी गेल्याने नळपाणी योजनेची पाइप रस्त्यावर आली आहे .
*रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे:*
राजापूर तालुका – 119.87 मिमी
रत्नागिरी – 77.55 मिमी
लांजा – 58.60 मिमी
संगमेश्वर – 51.91 मिमी
खेड – 48.57 मिमी
दापोली – 47.57 मिमी
मंडणगड – 31.75 मिमी
चिपळूण – 25.56 मिमी
गुहागर – 22.80 मिमी
आजच्या पावसाचा सरासरी हिशोब लावला असता प्रति तालुका सरासरी पाऊस 53.79 मिमी इतका झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांनुसार सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.