११ आणि १२ फेबुवारी २०१३ रोजी राज्यस्तरीय काजू परिषदेचे रत्नागिरीमध्ये नियोजन…

Spread the love

रत्नागिरी- गेली ५ वर्ष, काजू प्रक्रिया धारक संघ, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काजू उद्योगाला उभारी मिळण्याकरिता प्रयत्न करत आहेत.

काजू कारखानदारांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व्हावे, केसरकर समिती अहवालाची अंमलबजावणी व्हावी, नियमित कर्जफेड केणाऱ्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ व्हावे, नवीन उद्योजकांना बँकेच्या जाचक अटींमधून मुक्तता मिळावी, पणन आणि कृषीच्या माध्यमातून काजू बी चे संकलन व्हावे, काजू कारखानदारांना वर्षभर काजू बी पुरवठा व्हावा याकरिता काजू बोर्डामार्फत तरतूद व्हावी अशा विविध मागण्या मांडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सरकार दरबारी आमदार, मंत्री महोदय यांची भेट घेऊन या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या धर्तीवर काजू प्रक्रिया धारक संघ, रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून दिनांक ११ आणि १२ फेब्रुवारी २०१३ रोजी काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रक्रिया धारक यांना उभारी मिळण्याकरिता राज्यस्तरीय काजू परिषदेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघ, अध्यक्ष विवेक देवजी बारगीर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी काजू उत्पादक शेतकऱ्यांकरिता, लागवड, नियोजन, अर्थकारण, बाजारभाव, तसेच काजू उद्योजकांकारिता अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन, व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चेचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच काजू क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाकरीता महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी- रायगड चे पालकमंत्री उदय सामंत, संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकम, विधानपरिषद आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे, उद्योगपती किरण सामंत हे उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातून अनेक शेतकरी, तसेच इतर राज्यातून काजू व्यावसायिक, काजू व्यापारी, यंत्रसामग्री तयार करणारे कारखानदार या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page