रत्नागिरी- राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक कै. दत्तात्रय इनामदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धा पाचवी ते आठवी गटात घेण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी पर्यावरण संरक्षणात माझी भूमिका हा विषय देण्यात आला आहे. मराठी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहायचा आहे. निबंधासाठी ५०० शब्द मर्यादा आहे. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेले असावेत, मराठी व इंग्रजी या दोन गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत विनामूल्य प्रवेश आहे. विद्यार्थ्यानी आपले निबंध रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे मु. पो. लांजा, वैभव वसाहत, स्वामी स्वरूपानंद नगर येथे सोमवार दि. २० फेब्रुवारी पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. अधिक माहितीसाठी रवींद्र इनामदार, आर. व्ही. जानकर यांच्याशी संपर्क साधावा.