गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेवुन जात असताना….नेरळ पोलिसांची धरपकड.

Spread the love

नेरळ- सुमित क्षीरसागर गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेवुन जात असणाऱ्या कसायाला नेरळ पोलिसांनी वाहनासहित ताब्यात घेतले आहे.हा आरोपी खालापूर येथून ही जनावरे घेवून नेरळ बदलापूर दिशेने जात असताना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले.स्वप्नील सुरेश गायकवाड असे या आरोपीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत नेरळ पोलीस ठाणे येथे गोरक्षक एकत्र जमले होते.तर पोलिसांच्या या कामगिरीमुळे तीन जनावरांचे प्राण वाचल्याने त्यांचे कौतुक देखील होत आहे. खालापूर तालुक्यातील डोणवत नारंगी गावात राहणारा आरोपी स्वप्नील सुरेश गायकवाड हा आपल्या जवळील पिकअप टेंम्पो या वाहनातून गोवंशीय जातीचे तीन जनावरे कत्तलीसाठी घेवून निघाला होता.दरम्यान गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी पिकअप टेम्पो क्रमांक MH 06 BG 4974 हा कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मंमदापूर हॉटेल टीवाले येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आला असता नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल पाटील यांनी टेम्पोला अडवले होते.दरम्यान या टेंम्पो मध्ये तीन गोवंशीय जनावरे क्रुरतेने भरलेली पाटील यांना आढळून आली.तर उपस्थित काही गोरक्षक तरुणांनी येथे गर्दी केल्याने पोलीस हवलदार पाटील यांनी कार्यतत्परता दाखवत चालकाला वाहनासोबत नेरळ पोलीस ठाण्यात आणले असता अधिकारी वर्गाने चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आलं.दरम्यान ही माहिती पसरताच नेरळ शहरातील गोरक्षक प्रेमींनी पोलीस ठाण्यात एकाच गर्दी केली.यावेळी चौकशी अंती पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याने गोरक्षक निघून गेले.

यावेळी तीन गोवंशीय जनावरे आणि पिकअप टेंम्पो असा ऐकून अडीच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी याच्यावर प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1(घ)(ड)(ज)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी एक आरोपी असून त्याचे नाव ठिकाण सापडले नसल्याची माहिती नेरळ पोलिसांकडून देण्यात आली.दरम्यान अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लिंगप्पा सरगर हे करीत आहेत.


एकूणच नेरळ परीसारातील काही गावातील मागील दिवसांपासून शेतकऱ्यांची गोवंशीय जनावरे ही चोरीला जात आहेत.त्यामुळे ही जनावरे तीच आहेत का त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा तर टेंम्पोत क्रूरतेने भरून आणलेली ही जनावरे नक्की कोणाची आणि कुठे कत्तलीसाठी नेण्यात येत होती म्हणून आरोपी कडून चौकशी करण्यात यावी म्हणून मागणी पुढे येत आहे.हाकेच्या अंतरावर असलेले दामत गावात याआधी जनावरे कत्तलीसाठी आणली जात होती म्हणून आता गोरक्षक प्रेमी वर्गातून सांगण्यात येत आहे.त्यामुळे आता नव्याने कार्यभार स्वीकारलेले नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे हे गोरक्षक प्रेमींना योग्य न्याय मिळवून देण्यात किती यशस्वी ठरतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page