पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी खासदार विनायक राऊत यांचे नरेंद्र मोदींना चौकशीचे पत्र

Spread the love

रत्नागिरी : राजापूर येथे थार आणि दुचाकी अपघात होऊन त्यात पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता संसदेच्या अधिवेशनामध्ये गाजणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

याप्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा आरोप केला आहे. 

ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत म्हणाले की, नाणार संदर्भात लिखाण करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चालक पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थक होते. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचे राऊत म्हणाले.

अधिवेशनामध्ये शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी आवाज उठवणार असल्याचेही विनायक राऊत म्हणाले.काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. ‘मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाची ती बातमी होती. बातमीचे कात्रण ही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या बॅनर संदर्भात ही बातमी होती.

यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर-कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते; मात्र मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page