दिवा स्थानकावर होणार महत्वाचे बदल, मनसेच्या मागणीला यश

Spread the love

ठाणे: निलेश घाग दिवा रेल्वे स्थानका जवळील परिसरात फेरीवाल्यांमुळे वाहतूक मोठया प्रमाणात कोंडी वाढल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी दिवा प्रभाग समितीकडे फेरीवाल्यांच्या तक्रारी करूनदेखील अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर आणि दिवा रेल्वे स्थानक परिसरात सी.सी.टीव्ही द्वारे नजर ठेवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील दिवा रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी ठिकठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. या मागणीला महापालिका आयुक्तांच्या केलेल्या दिव्यातील दौऱ्यावेळी हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार आता दिवा स्थानक परिसरात सी.सी.टीव्ही द्वारे फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यासंदर्भात नागरिकांकडून ठाणे महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनदेखील योग्य प्रतिसाद मिळत नाही. तसेच महानगर पालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांकडून चिरी-मिरी घेऊन फेरीवाल्यांना प्रोत्साहन देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मात्र त्यानंतर देखील दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान अद्याप कायमच आहे. तसेच अनधिकृत वाहनांचे पार्किंग रिक्षांमुळे होणारी गर्दी यामुळे पादचाऱ्यांना वाट शोधण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. या मागणीला आयुक्तांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. ठाणे स्मार्ट योजनेअंतर्गत सी.सी.टीव्ही बसवून परिसरावर नजर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page