ठाणे : निलेश घाग भिवंडी मुंबई ठाणे अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा पायपास कल्याण शीळ फाटा मार्गावर अवजड वाहने रोखून रात्रीच्या वेळेस वाहन चालकांकडून पैसे घेतले जात असून यासंबंधीची छायाचित्रण मनसे आमदार राजू पाटील यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहन चालकांकडून पैसे वसूलीचे प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते भिवंडी शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत वाहतुकीस परवानगी आहे. भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे उरण येथील JNPT बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने या मार्गावरून वाहतुक नेहमीच करतात. अश्यावेळी वाहतुक रोखण्यासाठी या मार्गावर पोलिसांची विविध ठिकाणी पथके तैनात असतात. परंतु या मार्गावर रात्री मध्यरात्री अवजड वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याची चित्रफित आमदार राजू पाटिल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केली आहे.
रात्री अपरात्री मुंब्रा बायपास मार्गावर पैसे जमा करणारे हे अधिकारी कोण
कल्याण शीळ रोड वर रात्री दोन तासहून अधिक प्रमाणात वाहतुक कोंडी असते’ असा प्रश्न त्यांनी समाजमाध्यमावर ठाणे पोलिसांना केला आहे. या चित्रफितीमुळे ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलिसांना विचारले असता, संबंधित याप्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले
जाहिरात