![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/fb_img_17057370877624553798896049309096.jpg)
रत्नागिरी :- गेल्या काही महिन्यांपासून मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे . सुरुवातीला हे काम वेगाने सुरू होते ; परंतु आता काम संथगतीने सुरू असल्यामुळे याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे . या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उसळत असल्यामुळे वाहनचालक , पादचारी तसेच दुकानदार हैराण झाले आहेत .
सुरुवातीला रेल्वे स्टेशनपासून ते गयाळवाडी दरम्यान अचानक रस्ता खोदण्यात आला . त्यानंतर पुढे कारवांचीवाडी ते खेडशीपर्यंत एक बाजू खोदाई केली . हातखंबा तिठ्यापर्यंत काही भाग खोदाई केला आहे . ज्या भागात खोदाई केली तेथील काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित होते . मात्र , तसे न करता ठेकेदाराने थेट हातखंबा तिठ्यांपर्यंत रस्ताची खोदाई केली . यातून सर्व्हिस रोडची पूर्णतः दुरवस्था झाली आहे .
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240120-wa00517494589949683999082.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240120-wa00152974383009929582405.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img_20240119_1835012555281180350930584.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240119-wa01046826128681645033890.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/img-20240119-wa00588455356119927291782-300x300.jpg)