![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/09/images-4.jpeg)
कशेडी बोगद्यामुळे वाहतुकीचा ताण कमी, ४० मिनिटांचा घाट प्रवास फक्त १० मिनिटांत
मंबई-गोवा महामार्गावरून रायगड हद्दीतून जरी वाहने मार्गस्थ झाली तरी ती कशेडी घाटात तासनतास अडकत होती. गणेशोत्सव काळात तर ही समस्या गंभीर होत असे. यावर्षी कशेडी बोगद्यातील एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आल्याने घाटातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. शनिवारी दिवसभर या मार्गावरून वाहनांची संख्या वाढली तरी विनाअडथळा प्रवास सुरू आहे. कोकणात जाणारे चाकरमानी शुक्रवारी रात्रीपासूनच निघाले आहेत. मात्र, ही वाहने घाटातून पटकन निघत आहेत. पूर्वी हा घाट पार करण्यासाठी ४० मिनिटे लागत असत. वाहतूककोंडी झाली तर तासनतास येथे रखडावे लागत होते.
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230903-WA0063-9.jpg)
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230805_112040-1.jpg)
![](file:///storage/emulated/0/Android/media/com.whatsapp/WhatsApp/Media/WhatsApp Images/IMG-20230915-WA0033.jpg)