
रत्नागिरी- रत्नागिरी विधानसभा क्षेत्र प्रमुख भाजप नेते बाळासाहेब माने व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ,व माजी नगराध्यक्ष अशोक राव मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त , विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ रत्नागिरी व कबड्डी असोसिएशन व भाजपा रत्नागिरी आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार भाजप नेते निलेश राणे साहेब प्रमुख अथिती म्हणून लाभले होते, त्याच्या उपस्थित व भाजप नेते बाळासाहेब माने, अशोक राव मयेकर , माजी जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन, जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, तालुका अध्यक्ष दादा दळी, तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, राजू मयेकर, दादा ढेकणे, अमित विलणकर बावा नाचणकर, मुन्ना खामकर, हेमंत शेट्ये,राजन फाळके , खंडकर मंदार आदी भाजप पदाधिकारी याच्या उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न झाले.



या स्पर्धेत अंतिम सामना फारच रोमहर्षक व चुरशीचा झाला, सगळ्याच क्रीडा रसिकांनी भरभरून दाद दिली व अशी ताकदवर सामाने भरवल्यामुळे आयोजकांना धन्यवाद देखील दिले.
यावेळी बोलतात माजी खासदार निलेश राणे म्हणाले की मुंबई च्या धर्तीवर आपण आज तेवढ्या दर्जाचे कबड्डी सामाने रत्नागिरी मध्ये भरवले आहात याबाबत आयोजकांचे कौतुक केले.
या स्पर्धेत गजानन संघर्ष दापोली यांनी अंतिम विजेता रोख 51000/- चषक देऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौवराण्यात आले, तर द्वितीय क्रमांक दसपटी चिपळूण संघाला रोख 25000/- व चषक देऊन गौवरवण्यात आले. , तृतीय क्रमांक महापुरुष रत्नागिरी यांना रोख 15000/- व चषक आणी चौथा क्रमांक जय हिंद जय आबा या संघाला रोख 10000/- चषक देऊन गौवण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा नेतृत्व संकेत मयेकर यांनी अथक प्रयत्न केले तर विठ्ठल रखुमाई मंडळाचे कार्यकर्ते पराग हेळेकर, प्रवीण हेळेकर, भाई चव्हाण, साई टिकेकर, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, मंदार मयेकर, मनोज फनसोपकर, वैभव हेळेकर, अवधूत शेट्ये, सुनील सावंत, आदी सर्वांनी खूप मेहनत घेतली.