
नेरळ- सुमित क्षीरसागर
नेरळ येथील डॉक्टर हेमंत गंगोलिया यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका चिमुकलीला
डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच येथील सुरक्षा रक्षक कंपाऊंडर कमलाकर चव्हाण यांच्यामूळे जीव गमवावा लागला असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.दरम्यान या पोस्ट मध्ये आदिवासी संघटनेने आक्रमक होत काही प्रश्न उपस्थित करीत सदर प्रकरणात संबंधितांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे.

खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी येथील आदिवासी समाजातील दोन वर्षीय नेत्रा वामन पारधी ही चिमुकली आजारी असल्याने तिला कर्जत तालुक्यातील नेरळ येथील पूर्व परिसरात येत असलेल्या डॉक्टर हेमंत गंगोलीया यांच्या रुग्णालयात सोमवार 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी आणण्यात आले होते.दरम्यान यावेळी येथील रुग्णालयातील कंपाउंडर कमलाकर यांनी पहिले पैसे घेऊन ऍडमिट करीत तिच्यावर उपचार सूर केले होते. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील डॉक्टर यांनी नेत्राला अचानक डिचार्ज दिला.कोणतीही पूर्व कल्पना न देता तसेच माहिती न देता मुलीला घरी घेऊन उद्या परत घेवून या म्हणून मुलीच्या पालकांना सांगण्यात आले होते.परंतु नेत्राला घरी नेत असतानाच खालापूर येथील आंबेवाडी येथे रस्त्यातच मृत्यू झाल्याचे आई वडिलांना समजले.
एकूणच ही घटना वाऱ्यासारखी पसरली असता आदिवासी समाजातील काही पुढाऱ्यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि त्यात काही प्रश्न उपस्थित केले.
१) जर नेत्रा एवढी गंभीर आजारी होती तर डॉक्टरांनी तिला का? सोडली ,२) जर गंगोलीया डॉक्टरला त्याच्यात उपचार होत नव्हते तर त्यांनी मेमो देऊन उपचारासाठी मुलीला पुढे का पाठवले नाही? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत असून या आदिवासी चिमुकली नेत्राचा मृत्यू निव्वळ डॉक्टर हेमंत गंगोलिया व त्यांचे कंपाउंडर कमलाकर यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे झाला आहे म्हणून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या व सुधारित अधिनियम 2015-16 च्या कायद्या अंतर्गत कारवाई करावी असे मागणी आदिवासी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे, आदिवासी जनजागृती संस्थेचे संस्थापक बुद्धाची हिंदोळा तात्या, जिल्हा संघटनेचे खजिनदार दत्ता निरगुडा, खालापूर तालुका अध्यक्ष नारायण निरगुडे, सचिव रविंद्र बांगारे, कर्जत तालुका संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते सदानंद सिंगवा, संघटक सुरेश बांगारे, दामा दरवडा, पांडू सुतक, राजू उघडे, मंगळ पोकळा, रमेश आवाटे, पंकज वीर आदी समाज बांधव यांनी उपस्थित करीत यासाठी संघटनेकडून प्रथम नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजर झाले होते.
एकूणच याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर मुलगी ही खालापूर पोलिस ठाणे हद्दीत मयत झाल्याने तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दाखल करावी लागेल असे सांगण्यात आलं. तर मुलीचे मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे गरजेचे होते परंतु मुलीला तिच्या मृत्यू नंतर लगेच आदिवासी समाजाच्या रितीरिवाज नुसार जमिनीत पुरण्यात आल्याने तिचं तक्रारी नंतर कायद्याने शवविच्छेदन करणे गरजेचे असताना देखील तसे न झाल्याने तपास कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला,एक तर मुलीचे शव जमिनीतून बाहेर काढावे लागणार.परंतु मुलीचे कुटुंबाकडून याला विरोध होत असल्याचे समजतंय,शिवाय त्यांची कुठली तक्रार नसताना काही लोकांनी यावर आवाज उठवला असल्याचे देखील ऐकिवात आल्याचे समोर आलं.
एकूणच एका चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणात जर डॉक्टर आणि कंपाउंडर जर खरंच दोषी असेल आणि पुढील अशा घटना रोखायच्या असतील तर पोलिस विभाग आणि त्या संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.अन्यथा आज दोन वर्षीय नेत्राला आपला नाहक जीव गमवावा लागला तर उद्या न जाणो असे किती नेत्रा यांना आपला जीव गमवावा लागेल.
चौकट-
डॉ हेंमत गंगोलिया यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असताना तो होवू शकला नाही.मात्र येथील कंपाउंडर कमलाकर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता असे सांगितलं की आमच्या येथे रुग्णाला रात्रभर उपचारासाठी सोय नसल्याने आम्ही उपचार केल्यानंतर रुग्णाला घरी सोडत असतो,मुलीचे एक्सरे काढण्यासाठी म्हणून पालकांना सांगण्यात आले होते परंतु पालकांनी घरी नेले असल्याची माहिती दिली.