RTI कार्यकर्ते संतोष कदमांच्या निर्घृण हत्येबाबत सखोल चौकशी करा

Spread the love

संगमेश्वर ‘आरटीआय’ महासंघाचे देवरुख तहसीलदारांना निवेदन..

संगमेश्वर l 13 फेब्रुवारी- राज्यात गोळीबार प्रकरण, हत्येच्या घटना वारंवार घडत आहेत. यातच सांगली जिल्ह्यातील संतोष कदम या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडाने राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कदम यांच्या निर्घृण हत्येबाबत सखोल चौकशी करावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी संगमेश्वर आरटीआय महासंघाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणातील सत्य पोलीस तपासातून लवकरच अधिक स्पष्ट होईल. परंतु जनतेसाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्यांचा खून होणे ही खूपच चितेंची व काळजी करण्यासारखी बाब आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणांनी कदम यांच्या निर्घृण हत्येबाबत सखोल चौकशी करावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी. संतोष कदम यांचा खून झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मनात उठलेला आक्रोश सरकारपर्यंत निवदेनांच्या माध्यमातून पोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे आज मंगळवारी (दिनांक १३ फेब्रुवारी २०२३) आर टी आय कार्यकर्ता महासंघ संगमेश्वर तालुक्याच्यावतीने जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आर टी आय कार्यकर्ता महासंघाचे संगमेश्वर तालुकाअध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री मनोहर गुरव, उपाध्यक्ष श्री उदय पवार,कार्याध्यक्ष श्री शेखर जोगळे, सहसचिव श्री दिपक तावडे, सक्रिय कार्यकर्ते श्री हरिश्चंद्र गुरव, श्री नियाज खान श्री निखिल कोळवणकर,श्री प्रमोद रेवणे, श्री. काशिनाथ आणेराव, राजू चव्हाण, प्रचारप्रमुख श्री एकनाथ मोहिते, संदेश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page