![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/screenshot_2024_0206_1633054462940925874170580.jpg)
डिजीटल दबाव वृत्त
गेले वीस दिवस उलटले तरीसुद्धा अद्याप शहरातील श्रेष्ठी विद्यालयापासून मुसळे तिकटीपर्यंतच्या महामार्गाचे काम झालेले नाही. हा खोदलेला ५०० मीटरचा रस्ता ग्रामदैवत काळभैरव यात्रेपूर्वी २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावा, असा अल्टिमेटम उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे आज दिला.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/fb_img_169988068757773200331569591340989185540062789552667.jpg)
महामार्ग कामाच्या शहरातील संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत शिवसेना शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख संदीप कुराडे यांच्यासह शिवसैनिकांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी, ठेकेदार कंपनी प्रतिनिधी व तहसीलदार ऋषीकेत शेळके यांची भेट घेऊन चर्चा केली. महामार्ग कामासाठी श्रेष्ठी विद्यालय ते कडगाव रोडलगत मुसळे तिकटीपर्यंतचा रस्ता खोदला आहे. वीरशैव बॅंकेपर्यंतचा रस्ता खोदाई करून खडीकरण पूर्ण केले आहे.
या भागाचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्याची सूचना केली असता ५०० मीटर खोदाई होऊन खडीकरण होईपर्यंत कॉंक्रीटीकरण करता येत नसल्याचे उत्तर आले. यामुळे चिक्कोडे यांनी मुसळे तिकटीपर्यंत खोदाई केलेला रस्ता २० फेब्रुवारी अखेर पूर्ण करावा आणि यात्रा होईपर्यंत नव्याने रस्त्याची खोदाई न करण्याची सूचना केली. खोदाई झाल्यास एक इंचभरही काम करू न देण्याचा इशाराही दिला.
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/screenshot_2024_0110_091402108056867934181732.jpg)