![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/fb_img_170728723836946622857303617671.jpg)
रत्नागिरी :- तालुक्यातील चिंचखरी येथून कॉलेज तरुणी बेपत्ता झाल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे . श्रेया मिलिंद भाटकर ( १८ , रा . चिंचखरी , रत्नागिरी ) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे . शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ती गोगटे कॉलेजला जाते , असे सांगून घरातून बाहेर पडली होती . सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचा भाऊ अथर्व मिलिंद भाटकर ( २१ ) याने मैत्रिणींकडे तसेच आजूबाजूला शोध घेतला . श्रेयाचा कुठेच पत्ता न लागल्याने त्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली . या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत .
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/img-20240207-wa00651295529464288440789.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/screenshot_2024_0110_0914025190201020823341330.jpg)