
*संगमेश्वर प्रतिनिधी-* संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडल्याने व संरक्षक भिंत कोसळल्याने अवजड वाहतूक व एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशी,व्यापारी वर्ग व मालवाहतूकदार यांना मोठया समस्याना तोंड द्यावे लागत होते. आर्थिक नुकसान अधिक वेळ यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले होते. आंबा घाट हा रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याना जोडणारा व्यापारी दृष्ट्या महत्वाचा मार्ग आहे. याची दखल आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह आंबाघाटाची प्रत्यक्ष पाहणी केली. येणारा गणेशोउत्सव पाहता हा रस्ता सुरु होणे आवश्यक असल्याचे मत आमदारांनी व्यक्त केले.
मात्र रात्रीच्या वेळेस अवजड वाहतूक बंद ठेऊन दिवसा सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक सुरु करण्यासाठी संबंधी मत व्यक्त केले. मात्र अंतिम निर्णय अजून झाला नसून रत्नागिरी – व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रशासन यंत्रणा काय निर्णय घेणार यावर आंबा घाट सुरु होण्याचे अवलंबून आहे.
यावेळी आमदार किरण सामंत, बांधकाम सभापती विलास चाळके,रत्नागिरी – कोल्हापुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आर. टी. ओ., वाहतूक विभाग,पोलीस प्रशासन, पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*