रत्नागिरी येथील माजी नगरसेविका सौ.राजश्री बिपीन शिवलकर यांचे दुःखद निधन…

Spread the love

*रत्नागिरी-* रत्नागिरी मांडवी येथील  माजी नगरसेविका सौ.राजश्री बिपीन शिवलकर यांचे दुःखद निधन झाले आहे.

आज दुपारी 12 वाजता अंत्ययात्रा त्याच्या मांडवी येथील घरातून  निघून मिरकर वाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सौ.राजश्री (बंदरकर ) शिवलकर याच्या दुःखद निधना ने शोककळा पसरली आहे.

राजश्री शिवलकर या कॉलेज जीवनापासून अंत्यत मृदुभाषी प्रेमळ, व सगळ्याशी मिळून मिसळून वागणाऱ्या होत्या.काही काळ भाजप च्या नगरसेविका म्हणून ही त्यांनी काम केल होत.

आठ दिवसापूर्वी त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांना रत्नागिरी मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.व अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. पण सोमवारी मध्यरात्री उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली

आज दुपारी 12 वाजता अंत्ययात्रा त्याच्या मांडवी येथील रहात्या घरातून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.त्याच्या निधनाची माहिती मिळताच मित्रपरिवार, राजकीय क्षेत्रात, तसेच मांडवी गावावर शोक कळा पसरली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page