
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा.तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपोर्णिमा नुकतीच मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अशोक कंठाळे उपस्थित होते. यावेळी प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम, प्रा. साई पवार, प्रा. ऐश्वर्या कांबळे, प्रा. रिदा चिमावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. साई पवार, प्रा. ऐश्वर्या कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. अषोक कंठाळे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. गुरु-शिष्यचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते. गुरु-शिष्य परंपरा ही आपण सर्वांनी पुढे चालू ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रभारी प्राचार्य वाल्मिक परहर यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीमध्ये गुरूला अनन्यसाधारण असे महत्व आहे. भारताला गुरूंची गौरवशाली परंपरा लाभली आहे. आपल्या गुरूंप्रती विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला आदर खरोखरच कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महादेव वाघ यांनी तर आभार प्रा. साई पवार यांनी मानले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*