
काँग्रेस नेते म्हणाले की, 40 लाख रुपयांमध्ये नोकऱ्या दिल्या जात आहेत किंवा लोकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत केली जात आहे.
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. बुधवारी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शिक्षण व्यवस्था कॉर्पोरेट कंपन्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. राहुल गांधी म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. ते शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची मागणी करत आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.” काँग्रेस नेते म्हणाले की, 40 लाख रुपयांमध्ये नोकऱ्या दिल्या जात आहेत किंवा लोकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत केली जात आहे.
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज…
राहुल गांधी म्हणाले की, आपली शिक्षण व्यवस्था, जी एकेकाळी जगातील सर्वोत्तम होती, ती आता ढासाळली आहे. त्यामुळे आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. राहुल गांधी म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. खरं तर याचा परिणाम 7.5 कोटी कुटुंबांवर होत आहे. गेल्या 10 वर्षांत 152 पेपरफुटी झाल्या आहेत. सरासरी दर महिन्याला एक पेपरफुटी होते. यापैकी एकाही प्रकरणात एकाही व्यक्तीला शिक्षा झालेली नाही. संपूर्ण व्यवस्थाच आवाक्याबाहेरची झाली आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
विद्यार्थ्यांना पेलेट गनने मारले जात आहे..
विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकार कर गोळा करते आणि मग शिक्षणाचे बजेट तयार करते. असा अंदाज आहे की, जे विद्यार्थी वर्षाला नीट (NEET) परीक्षा देतात, त्यांची कुटुंबे वैयक्तिकरित्या 1.32 लाख कोटी रुपये खर्च करतात. ही रक्कम जवळपास शिक्षण बजेटच्या बरोबर आहे. शिक्षण बजेट 1.40 लाख कोटी रुपये आहे. आता तुम्हाला या खेळाची व्याप्ती कळली असेल. धर्मेंद्र प्रधान हे एक अकार्यक्षम शिक्षणमंत्री आहेत; त्यांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो. विद्यार्थ्यांना पेलेट गनने मारले जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणीही राहुल गांधींनी केलीय.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*