डॉक्टर तानाजीराव चोरगे कनिष्ठ शास्त्र महाविद्यालय, मांडकी- पालवन येथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न…

Spread the love


*चिपळूण प्रतिनिधी-* डॉक्टर तानाजीराव चोरगे कनिष्ठ महाविद्यालय,मांडकी- पालवन येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेतलेल्या इयत्ता अकरावीच्या नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सौ.अंजलीताई चोरगे या होत्या तर आंतरराष्ट्रीय रायफल शूटर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ.यशिका शिंदे निकम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.मान्यवरांच्या स्वागतानंतर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ जानवी कांबळे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा व गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा परिचय करून दिला. यानंतर प्रा. पवार मॅडम यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ यशिका शिंदे -निकम यांचा परिचय सांगून महाविद्यालयातर्फे शाल,श्रीफळ व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनोगतनंतर इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत व सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य तांबेकर सर यांच्या प्रेरणेतून यावर्षीपासून आमच्या महाविद्यालयात ज्या कुटुंबातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण घेतील अशा कुटुंबातील पालकांचा सन्मान करण्याचा संकल्प करून त्याची सुरुवात ढोकरवली गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री मनोहर जी महाडिक यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सचिन तांबेकर यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा गुणवत्तापूर्ण शिक्षण विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यानंतर प्रमुख पाहुण्या सौ. यशिका शिंदे निकम यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी च्या बळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविता येते, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

मा. मनोहर जी महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच संस्कार आणि शिस्त आयुष्यात खूप महत्त्वाची आहे असा या महाविद्यालयाचा लौकिक आहे असे सांगितले. जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणातून मा. सौ. अंजलीताई चोरगे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार,सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व अंगीकारावे असे प्रतिपादन केले तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी डॉ तानाजीराव चोरगे कृषी व शिक्षण संस्थेच्या संचालिका व शालेय समितीच्या अध्यक्षा मा.सौ. अंजली चोरगे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या, आंतरराष्ट्रीय रायफल शूटर मा. सौ. यशिका शिंदे -निकम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, ढोकरवली गावचे प्रतिष्ठित नागरिक मा श्री मनोहर जी महाडिक, शालेय समितीचे सदस्य श्री संजय भागडे, सौ.गीता पाटील सौ जानवी कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सचिन तांबेकर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी विज्ञान शाखेची कुमारी अदिती कोदारे हिने तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी पुनवत हिने केले. उत्साह पूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्वागत समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक सुरुवात झाली . अशा प्रकारे स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page