
महाड / प्रतिनिधी- कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड विन्हेरेतुळशी खिंड नातू नगर रस्त्यावर तुळशी खुर्द गावाजवळ मध्यरात्री दरड आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी या रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम जेसीबी यंत्राच्या साह्याने चालू केलेआहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला पर्याय राज्य मार्ग म्हणून महाड विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर या रस्ता कडे पाहिले जात होते त्यासाठी या रस्त्याचे नातू नगर पासून हा रस्ता रुंदीकरण करून त्याचे काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले तसेच रायगड जिल्ह्यातील तुळशी खिंड ते विन्हेरे पर्यंतचा रस्ता देखील रुंदीकरण करून मोठा करण्यात आला मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने या मार्गावरील पूर्वीसारखी वाहतूक कमी झाली आहे तरी देखील दोन्ही जिल्ह्याला जोडणारा व दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरील भागातील गावांना हा रस्ता आज देखील महत्त्वाचा दुवा ठरला आहे.
महाड विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर या रस्त्यावरील तुळशी खुर्द गावाजवळ मध्यरात्री आलेले दर्डीमुळे या मार्गावरून खेड कडे जाणारी वाहतूक तसेच तुळशी गावातून खेड कडे जाणारी एसटी बस देखील रस्त्याच्या मधोमध थांबलेली होती आता या रस्त्यावर आलेली दरड काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड कडून युद्धपातळीवर चालू असून मोठ्या प्रमाणावर आलेली दरड बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला जात आहे.
डोंगर सपाटीकरणामुळे दरड कोसळली?..
महाड विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर रस्त्यावर तुळशी खुर्द गावाजवळ ज्या ठिकाणी दरड आली आहे त्यापासून किमान २००मीटर अंतरावर रस्त्याच्या अगदी बाजूला असणाऱ्या डोंगराजवळ डोंगर सपाटी करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी या ठिकाणी डोंगरातूनच रस्ता करण्यात आला आहे. त्याचा परिणाम डोंगर माथ्यावरील झालेले उत्खनन डोंगराला पडलेला भेगा यामुळे पावसाचे पाणी या डोंगरामधील उत्खनन केलेल्या जागेवर जाऊन या ठिकाणी दरड कोसळली असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांकडून चर्चिले जात होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*