
*मुंबई/ प्रतिनिधी-* राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणणारी एक महत्त्वाची घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
या विमानप्रवासात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसले होते, तर संजय राऊत आणि अनिल देसाई मागील सीटवर असल्याचे पाहायला मिळाले.
‘आपण भेटलो, हीच मोठी बातमी’…
माहितीनुसार, विमानात भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना “आपण भेटलो, हीच मोठी बातमी आहे,” असे मिश्कीलपणे म्हटले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांची विचारपूस झाली. तसेच देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्येही काही वेळ संवाद झाल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय घडामोडींमध्ये वाढले महत्त्व…
अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच दौऱ्याचा भाग म्हणून 27 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ-वाशीम दौरा असून त्यासाठी ते नागपूरला जात होते. योगायोगाने त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रवास करत असल्याने या भेटीची राज्यभर चर्चा रंगली आहे. (
विमानात होते हे नेते…
या विमानप्रवासात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

