
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
मुंबई- आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. या विजयाने भारताने टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सलामी विजयी सलामी दिली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. प्रतिउत्तरात अमेरिकेचा संघ २० षटकात ८ गडी गमावून १३२ धावांच करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने ७७ धावांवर आपल्या ७ विकेट्स गामावल्या होत्या. भारताचा कर्णधार एका बाजूने टिकून खेळत होता आणि त्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. इशान किशन १६ चेंडूत २० धावा, तिलक वर्मा २५ धावा. शिवम दुबे ० धावा, रिंकू सिंग ६ धावा, हार्दिक पंड्या ५ धावा, अक्षर पटेल धावा र्शदीप सिंग ४ धावा कडून बाद झाले तर सूर्यकुमार यादवने भारताला १६१ पर्यंत पोहचवले आणि तो ४९ चेंडूत ८४ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले. तर वरुण चक्रवर्ती ० धावांवर धावबाद झाला. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४ तर हरमीत सिंगने २ विकेट्स घेतल्या. तसेच अली खान आणि मोहम्मद मोहसीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
अमेरिकेचा डाव-
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ७१ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. अँड्रिज गॉस ६ धावा, सैतेजा मुक्कामल्ला २ धावा, कर्णधार मोनांक पटेल भोपळा न फोडता माघारी गेला. त्यानंतर मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती या दोघांनी ५३ धावांची भागीदारी रचून संघाला आशा दाखवल्या परंतु, त्याचा उपयोग होऊ शकला नाही. मिलिंद कुमार ३४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कृष्णमूर्ती ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र संघाच्या विकेट्स जात राहिल्या. , शुभम रांजणे ३७ धावा, हरमीत सिंग ० धावा, मोहम्मद मोहसीन ८ धावा करून बाद झाले तर शेडली व्हॅन शाल्कविक धावांवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या. तर वरुण चक्रवर्तीने १ विकेट घेतली.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*