अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं, सोयाबीन, कांदा पिक वाहून गेलं; धाराशिवमधील हवालदिल शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा…

Spread the love

*धाराशिव-* धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने एक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय-४२, रा. म्हात्रेवाडी ता. भूम) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कांदा पिकांचे पूर्णतः नुकसान, जमीन खरवडून जाणे आणि आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावाखाली होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हात्रेवाडी परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे शेतात पाणी साचले, नदीचे पाणी शिरले आणि जमिनीतील माती वाहून गेली. पीक तर वाहून गेलेच, पण पुन्हा शेतीस उभे करणे अशक्य होईल इतकी परिस्थिती निर्माण झाली. या सर्वांमुळे लक्ष्मण पवार हे हवालदिल झाले होते. यामुळे लक्ष्मण पवार यांनी यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हात्रेवाडी येथील पवार कुटुंबाला भेट देऊन १ लाख रुपयांची तातडीची मदत केली.

त्यांच्या या पावलाने कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला, मात्र राज्य सरकारकडून कोणतीही ठोस मदत अद्याप मिळालेली नाही. शेतकरी कुटुंबाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. तर गावकऱ्यांनी देखील सरकारकडे तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. यात दीड एकर जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण पवार या शेतकऱ्याने शेतात सोयाबीन आणि कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र हे दोन्ही पीक अतिवृष्टी मध्ये वाहून गेल्यामुळे शेतकरी लक्ष्मण पवार हातबल झाले होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलून गळफास घेत आत्महत्या केली. लक्ष्मण पवार यांच्या आत्महत्येमुळे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी गेला आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page