
कोदवली साहेबाच्या धरणाजवळ नदीकिणारी एकुण चार गुफा मंदिरे ही वकाटक राजवटीतील असल्याचा इतिहास अभ्यासकांचे मत .…
६ व्या शतकातील ही शैव गुफा मंदिरे जंगल झाडीने वेढलेली…
राजापूर – राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील साहेबाच्या धरणाजवळ नदीच्या बाजुला एकुण चार गुफा मंदिरे सापडली असुन ती वाकाटक राजवटीच्या काळातली असल्याचा अंदाज काही इतिहसकारानी वर्तवला आहे . कोदवली येथील शिवाजी कुंभार व पत्रकार विनोद पवार याना ही एकपाषाणी गुफा मंदीरे सापडली आहेत .
वाकाटक राजवट भारताच्या दक्षिण भागात तिसऱ्या शतकापासुन सहाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती . विंद्यशक्ती हा राजा या वाकाटक साम्राज्याचा संस्थापक मानला जातो . या वाकाटक साम्राज्याचा विस्तार दख्खन म्हणजे दक्षिणेकडुन सुरु झाला . उत्तरेकडील माळवा व गुजरातच्या दक्षिण किणाऱ्यापर्यंत पसरलेले हे साम्राज्य तुंगभद्रा नदीपासुन पश्चिमेच्या अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेले होते . कोकणही या साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता .
वाकाटक साम्राज्यात एकशिळा मंदिरे व गुफा मंदिरे यांच्या वास्तुकलेला प्रोत्साहन दिले गेले . साधारण दुसऱ्या शतकापासुन राजापूर बंदरातुन रोमन साम्राज्याशी मोठ्याप्रमाणात व्यापार होत असल्याचे उल्लेख प्राचिन भारताच्या इतिहासात मिळतात . बारसु येथे सापडलेल्या कातळशिल्पाचा विचार केला तर अगदी अश्मयुगापासुन हे बंदर अस्तित्वात असल्याचे मानले जाते कारण बारसुच्या सड्यावर सापडलेले कातळशिल्प व जगातील प्राचिन मानल्या गेलेल्या चार सभ्यतामध्ये ( इंडस व्हॅली , मेसोपोटेनियम , इजिप्शियन व चायना) सापडलेली सिल वरील चित्र जुळणारे असुन त्या सिलवरील चित्राचे विस्तृत स्वरुप बारसुच्या कातळशिल्पात कोरलेले आहे . यावरुन राजापूर बंदर हे अगोदरपासुन जगाशी व्यापार करत होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . प्राचिन संस्कृतीत सापडलेली सिल वरील चिन्हे व बारसुचे कातळशिल्पातील चित्र एकच असल्याने या प्राचिन संस्कृतीचा उगम राजापूरच्या बारसुतुन झाला असेल का ? हा प्रश्न बारसुच्या कातळशिल्पाच्या अभ्यासानंतर जगासमोर येणार आहे .
त्यातच आता वाकाटक साम्राज्याच्या काळातील कोदवली येथे सापडलेली शैव पंतीय गुफा मंदिरे ही राजापूरच्या प्राचिनतेचे महत्व अधोरेखीत करणारी आहेत . कदाचित राजापूर बंदरातुन कोदवली मार्गे गोड्या नदीच्या पश्चिम किणाऱ्यावरुन या साम्राज्यांचा राजमार्ग असल्याच्या त्या खुना असल्याचा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे .
काय व कशा आहेत या गुफा …
राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील इंग्रज कालीन साहेबाच्या धरणाच्या खालच्या बाजुला साधारण ५०० मिटरच्या अंतरावर ही गुफा मंदिरे असुन ती शैवपथिय असल्याचे त्यांच्या रचनेवरुन दिसुन येते . एकपाशाणी असणाऱ्या या गुफान्मधील एका एकपाषाणी मंदिराचा विस्तार मोठा आहे . त्याचे प्रवेशद्वार तीन फुट रुंद व पाच फुट उंच आहे . तर आतील भाग हा साधारण आठ फुट लांब व सहाफुट रुंद आहे . तर उर्वरीत तीन मंदिरे छोटी आहेत . येथील काही पाषाणांवर अर्धवट कोरलेली मंदिरेही आहेत .
त्यातील प्रत्येक गुफा मंदिरात एक चौथरा असुन एका मुख्य व मोठ्या गुफा मंदिरातील या तीन फुट रुंद व चार फुट लांब असणाऱ्या त्या चौथऱ्याला वरुन खालीपर्यंत जाणारे एक छिद्र आहे . कोदवली नदी पात्रालागत ही गुफा मंदिरे असुन त्याच्या बाजुनेच राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाण्याची इंग्रज कालीन पाइप लाइन आहे . हा संपुर्ण गुफा मंदिर परिसर लॅटराइट दगडाचा असुन त्याच लॅटराइट दगडात ही गुफा मंदिरे कोरलेली आहेत . एक गुफा मंदिर खुपच छोटे असुन त्याची उंची साधारण तीन फुट आहे . तर आतील भाग हा तीन फुट लांब व दोन फुट रुंद आहे . तर तीन नबरचे गुफा मंदीर पहिल्या मंदिरा एवढे असले तरी त्याचा आतील भाग हा चार फुट लांब तर तीन फुट रुंद आहे , सध्या हे तीन नंबरचे एकपाषाणी गुफा मंदीर पाण्याने भरलेले आहे . तर चौथे एकपाषाणी गुफा मंदीर हे अर्धवट स्थितीत कोरलेल आहे .
या गुफा मंदिराचा अभ्यास योग्य प्रकारे व विस्तृत झाल्यास राजापूरच्या प्राचिन इतिहासाला चालना मिळणार आहे . सद्यस्थितीत अतिशय जंगल भागात व नदीकाठी असणाऱ्या या मंदिराची साफसफाइ व त्यांचे जतन संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे .
कोदवली शंकरेश्वर मंदिराजवळील एकपाषाणी मंदिर –
याच कोदवली नदीच्या पश्चिम किणाऱ्यावर असणाऱ्या कोदवली येथील शंकरेश्वराच्या मंदिरालगत अजुन एक एकपाषाणी मंदिर असुन त्यामध्ये शिवलिंग स्थापित आहे . हे एकपाषाणी मंदिरही साधारण याच वकाटक राजवटीतील असल्याचे मानले जाते . मात्र येथील ग्रामस्थानी आता या एकपाषाणी मंदिराला सिमेंट प्लास्टर केला आहे .
वाकाटक साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे आणि साम्राज्य होते, जे तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत (इ.स. २५० ते ५००) अस्तित्वात होते. वाकाटकांनी विदर्भ आणि त्या लगतच्या प्रदेशात राज्य केले. त्यांची सत्ता उत्तरेकडे माळवा आणि दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरली होती, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत त्यांचा प्रभाव होता.
इसविसन ४७५ ते ५०० या काळात वकाटक राजवंशाचा शेवटचा राजा हरिषेन हा बलाढ्य होता . वाकाटक साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे साम्राज्य होते, जे तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत (इ.स. २५० ते ५००) अस्तित्वात होते. वाकाटकांनी विदर्भ आणि त्या लगतच्या प्रदेशात राज्य केले. त्यांची सत्ता उत्तरेकडे माळवा आणि दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरली होती, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत त्यांचा प्रभाव होता. व त्यांचा अम्मल कोकणावरही होता . या त्यांच्या कालखंडातच ही कोदवली येथील शैव लेणी कोरली गेली असावीत कारण वकाटक हे शिवभक्त होते असा उल्लेख इतिहासात सापडतो .