मुरादपूर मार्लेश्वर कळकदरा रस्त्यासाठी जमीन भुसंपादन करून मोबदला द्यावा,मागणी धुडकावून लावली तर स्वातंत्रदिनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा…

Spread the love

संगमेश्वर प्रतिनिधी- मुरादपूर मार्लेश्वर कळकदरा रस्ता साठी जमीन भुसंपादन करा शेतकऱ्यांची मागणी मागणी मान्य न झाल्यास
स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणाला बसणार असणार असल्याचा इशारा 10 गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

या सर्व पिडीत शेतकरी यांचे शिष्टमंडळ स्थानिक आमदार शेखर निकम यांना भेट घेवून यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करणार आहे.

जमीन ताब्यात नसताना सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे टेंडर कसे काढले असा मूलभूत प्रश्न शेतकरी विचारीत असून भुसंपादनाची मागणी करूनही भू संपादन न करताच सार्वजनिक बांधकाम खाते ह्या रस्त्याच्या काँक्रेटीकरणाचे काम पुढे रेटीत असल्याबद्दल शेतकऱ्यामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून जोर जबरदस्तीने शेकऱ्यांच्या जमिनीत जर काम सुरु करण्यात आले तर रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी शरद पवार आणि अशोक अणेराव यांनी प्रशासनाला दिला आहे.

या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस निर्णय घेतला नाही तर सर्व गावातील बाधीत शेतकऱ्यांसह 15 ऑगस्ट पासून देवरूख तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती शरद पवार आणि अशोक अणेराव या दोघांनी दिली आहे

या प्रश्नाबाबत आंगवली, मारळ, बामणोली खडी कोळवण, ओझरे खुर्द, कासारकोळवण, निवे खुर्द, मुरादपूर,हातीव या गावातील 160 हुन अधिक लोकांनी जिल्हाधिकारी आणि आमदार शेखर निकम यांना दोन महिन्यापूर्वी पत्र वजा निवेदन देऊन भुसंपादन मोबदला देवून मगच रस्ता करावा तोपर्यंत या रस्त्याच्या कामाला स्थगिति द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली होती.

परंतु प्रशासन ठेकेदारासह लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली राहून काम करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे
या रत्याच्या शेकडो कोटी रुपयांच्या काँक्रेटीकरणाचे काम रत्नागिरी येथील आर डी सामंत या कंपनीला मिळाले असून आंगवली येथे काँक्रेट मिक्स प्लांट उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.

जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे
आमदार शेखर निकम यांची दि २७ रोजी भेटीची वेळ दीली आहे या भेटीला सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार असून या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी करणार असून आम्हाला विकास हवा परंतु शेतकऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरवून जर विकास होणार असेल तर त्याला लोकशाही च्या मार्गाने आम्ही विरोध करू असे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page