गोवळकोट रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाय; नागरिकांत समाधानाची लाट..

Spread the love

चिपळूण : गोवळकोट रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाला अखेर निरोप मिळाला आहे. या भागातील नागरिकांना अनेक दिवसांपासून रस्त्यावर सतत पाणी साचल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येकडे शिवसेनेचे कार्यकर्ते फैसलजी मेमन यांनी लक्ष वेधले.

त्यांनी शिवसेना शहरप्रमुख उमेशजी सकपाळ यांच्याकडे ही बाब मांडली. सकपाळ यांनीही तातडीने लक्ष देत चिपळूण नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणी केली. यानंतर तत्काळ उपाययोजना करत त्या ठिकाणी आवश्यक काम हाती घेण्यात आले.

यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत झाला असून नागरिकांनी या जलद प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी फैसल मेमन व उमेश सकपाळ यांचे आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page