
रत्नागिरी /प्रतिनिधी- दोन्ही बाजूच्या लोकांशी आपलं बोलण झालं असून एकत्र बसून हे वाद मिटवले पाहिजे असे ही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
याबाबत बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की
दोन्ही बाजूने इगो सोडला पाहिजे. रत्नागिरी मधील पतित पावन मंदिर फार मोठी मौल्यवान वास्तू आहे. त्याला स्वतःचा इतिहास आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कशा पद्धतीने भागोजी शेठ किर यांना विनंती केली. आणि त्याच्यातून हे मंदिर उभे राहिले आहे आणि त्याचा वारसा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याचा वारसा दानशूर भागोजी शेठ किर यांचा आहे.
अशा वास्तूमध्ये कुठले वाद विवाद होऊ नये लोकप्रतिनिधी म्हणून माझं मत आहे. पतित पावन मंदिरामुळे कुठल्याही जाती जातीत वाद होऊ नयेत. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसांनी पदस्पर्शाने पावन झालेली ती रत्नागिरी भूमी आहे . जगाला दानशूर कसा असावा हे दाखवणार भागोजी शेठ किरा चा दातृत्व होतं व्यक्तिमत्व होतं.
त्या दोघांचे असलेले जवळचे संबंध त्या दोघांचं असलेलं जवळकीचं नातं आणि त्या दोघांचे असलेले देशा प्रतीचे प्रेम आणि ही सगळ त्याच्यातून ही वास्तू निर्माण झाली. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या एवढं नाही पण त्या दोघांचं एवढं थोडं फार जरी आपण अनुकरण केलं तर हे सगळे वाद मिटून जातील.