
महामार्ग विभाग आणि ठेकेदाराचे मनमानी कारभार, सुदैवाने जीवित हानी नाही, वाहतूक सुरळीत!
*संगमेश्वर/ प्रतिनिधी/दि २६ एप्रिल-* सकाळी साडे आठच्या सुमारास संगमेश्वर शास्त्री पूल येथील ती धोकादायक दरड अखेर कोसळली. स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी मागणी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. मुळात पाच सहा दिवसापूर्वी सदर माती ढासळत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु कॉन्ट्रॅक्टर कडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नव्हती. सदर बाब आम सभेमध्ये इलियाजमापारी यांनी मांडली होती तसेच अन्य नागरी कधी आमसभेमध्ये विषय मांडलेले आहेत. तरीही निर्लज्ज प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याने सदरची घटना घडली आहे.


जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण?
या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही. एका महिलेस किरकोळ दुखापत आणि एका ऑटो रिक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक रोखून धरत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.*MH 08 AQ 5909* क्रमांकाची रिक्षा सदर मातीच्या घसरण्याने पलटी झाली. आज मोठ्या प्रमाणात माती आली असती तर त्याला जबाबदार कोण प्रश्न उपस्थित होत आहे. कुलकर्णी व सदर हायवेचे काम करणारे अधिकारी सदर घटनेस जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक वेळेला अपघात झाल्यावरच जे म्हात्रे कंट्रक्शन चे मॅनेजर जागेवर येतो प्रत्येक वेळेला सेटलमेंट करून विषय संपवण्यात नाही असल्याने कारवाई कंपनीवर होत नाही. जीवित हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण याचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग देणार का? मी लोकांमध्ये चर्चा करण्यात येत आहे.

कसबा ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील लोकांचे स्वतंत्र रस्त्याची मागणी…
कसबा ग्रामपंचायतीकडून स्वतंत्र रस्त्याची मागणी करण्यात आलेली असून त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. गेले दोन महिने मागणी असूनही माती काढण्या टाळाटाळ करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचे भगव्या स्मारक कसबे मध्ये होत असताना लोकांची मागणी असूनही भूसंपादित केलेल्या जागेचे माती का करण्यात आली नाही हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे त्याची चौकशी व्हावी अशी इलियाज मापारी मागणी यांनी केली आहे. सदर घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आम सभेमध्ये युसूफ कावणकर यांच्या पत्रावरती उप अभियंता कुलकर्णी याची पालकमंत्री उदय सामंत यांनी कान उघडणे केले आहे तरी प्रशासन शांत बसून का राहिले कोणाचा दबाव या सगळ्या कामासाठी येत आहे याचीही चौकशी व्हावी असे नागरिकांची मागणी आहे.

ग्रामस्थांनी सर्व स्तरातील उच्च पदस्थ अधिकारी, यांच्या निदर्शनास ही धोकादायक दरड आणून दिली होती. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.उभे डोंगर कापून रस्ता बनवला जातो आहे. अशा परिस्थितीत ज्या गोष्टी मानवी जिवितासाठी धोकादायक आहेत त्याठिकाणी वेळीच उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे होते. परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे सदरचे दरड कोसळली आहे लोकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होणार का?
यापूर्वी झालेल्या अपघात आतापर्यंत शेकडो लोक मृत्युमुखी पडू नये कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत आहेत . गुन्हा दाखल करण्याचे कामही करण्यात आलेले नाही ही शोकांतिका आहे सामाजिक कार्यकर्त्यांकडून बोलले जाते आहे. संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले आणि हे संकट ओढवून घेतले.या दुर्घटनेत मोठ्या प्रकारची हानी झाली नसली तरी संगमेश्वर एसटी स्टँड ते शास्त्री पूल येथील संभाव्य दुर्घटनाग्रस्त ठिकाणांवर वेळीच योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी वर्गाने सुचना कराव्यात अशी मागणी होत आहे.
साडेबारा लाख रुपयाचा हप्ता संभाजी ब्रिगेड रत्नागिरी जिल्हाध्यक्ष परशुराम पवार यांचा गंभीर आरोप..
सदर वेळेला सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. सदर रस्त्याच्या कामामध्ये आजपर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झालेल्या असून सामाजिक कार्यकर्त्यांची पत्रे हे विविध कार्यालय मध्ये पडून आहेत परंतु कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 मधील टप्पा क्रमांक सहा चे कॉन्ट्रॅक्टर हुजूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, व सब कॉन्ट्रॅक्टर जे. एम .म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी तहसील कार्यालयापासून आरटीओ ऑफिस पर्यंत प्रत्येकाला हप्ते देण्याचे काम करते म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होत नाही. असे नागरिकांकडून आरोप करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष परशुराम पवार यांनी वरपासून कालपर्यंत साडेबारा लाख रुपयांचे हफ्ते दर महिन्याला दिले जात असल्याचे आरोप केला आहे. ऑलरेडी गुन्हा दाखल करण्याचे पत्र संगमेश्वर पोलीस स्टेशन व रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित आहे परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही . ही बाब गंभीर असून सदर विषयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे. आजपर्यंत अनेक मृत्यू झालेल्या असून पैसे देऊन सदरचा विषय मिटवण्यात आलेला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा योजना भ्रष्ट झाल्यामुळेच अशा घटना घडतात व मुंबई गोवा विलंब झाला आहे त्याचे कारणही तेच असल्याचे बोलले जात आहे.