नेरळ सुगवे राज्यमार्ग रस्त्यावरील कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण

Spread the love

आठ कोटींचा निधी मंजूर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

नेरळ: सुमित क्षीरसागर कर्जत तालुक्यातील नेरळ सुगवे लोभेवाडी राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करोडोंची कामे सुरू आहेत.याच माध्यमातून कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिर ते तळवडे पुल या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे.त्या कामासाठी तब्बलकोटी ७७ लाखाचा निधी मंजूर असून या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.दरम्यान,या रस्त्यावर बांधकाम करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमण यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजावल्या असून पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला आहे. नेरळ पिंपलोलीसुगवेलोभेवाडी या राज्यमार्ग १०४ वर रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण कामे तळवडे पुल ते काळेवाडी तसेच अंत्राट ते लोभे वाडी या भागात सुरू आहेत.तळवडे पुल पासून लोभेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून पाच कोटींचा निधी मिळाला आहे.या रस्त्यावर कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची सूचना स्थानिकांची असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी अर्थ संकल्पतून मोठा निधी मंजूर करून दिला आहे.नेरळ सुगवे राज्यमार्ग रस्त्यावर कोल्हारे ग्रामपंचायत भागातील साई मंदिर ते बोपेळे आणि तळवडे पुल या भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी तब्बल कोटी ७७ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.या रस्त्यावर साडे पाच मीटर रुंदीचा रस्ता बनविला जाणारा असून मंजूर निधी मधून ज्या भागापर्यंत रस्ता काँक्रिटच्या सहायाने बनला जाईल तेथे पर्यंत काँक्रीटीकरण केले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत, त्यामुळे रस्त्याचे काँक्रीटीकरण साडे पाच मीटर रुंदीचा रस्ता बनविण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करणे आवश्यक बाब आहे.त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग या राज्यमार्ग रस्त्यावर असलेली अतिक्रमणे दूर करण्यासाठी संबंधित यांना नोटिसा पाठवल्या आहेत.त्यात कोल्हारे ग्रामपंचायत मधील २६ अतिक्रमण धारक यांना नोटीस पाठवली असून त्यांना १५ दिवसात अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर स्थानिक पातळीवर अतिक्रमण काढताना कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.ते लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी रायगड पोलीस यांच्याकडे बंदोबस्त देखील मागितला आहे.त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून ३१ ऑक्टोबर रोजी पत्र देण्यात आले आहे.आता स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा नोटिसा मिळाल्यानंतर स्वतःहून बांधकामे बाजूला केली तर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे बाजूला करण्याची वेळ येणार नाही.मात्र अतिक्रमणे स्वतःहून बाजूला केली गेली नाहीत तर मात्र दिवाळी सणानंतर नेरळ सुगवे राज्यमार्ग रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेवून अतिक्रमणे बाजूला केली जातील असे बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी सांगितले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page