निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये धार्मिक,जातीय विद्वेष वाढले, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

Spread the love

ठाणे- कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी आज सकाळी हिंदूत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.अशात या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण लावलं असून अनेक ठिकाणी दगडफेकीसारख्या घटना देखील घडल्या आहेत. पोलीसांनी सौम्य लाठी चार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.दरम्यान या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

अशात महाराष्ट्र सरकारला म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारलाच महाराष्ट्रात दंगली घडवायाच्या आहेत असा गंभीर आरोप आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदू संघटनांनी आंदोलन केलं. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने हा प्रकार घडला. त्या विषयावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

तसंच, ‘निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये धार्मिक,जातीय विद्वेष वाढला आहे.आपल्यावर आले,की सगळे शरद पवारांवर ढकलायचे. राज्य सांभाळता येत नसेल तर शरद पवारांना सांगा की पवार साहेब या तुम्ही आणि राज्य ताब्यात घ्या हे आमचं काम नाही. आमच्या भाषेत बोलायचे तर हागल्या मुतल्याला पवारांचे नाव घ्यायचे. कुणाला जुलाब झाले तर शरद पवारांमुळे, कोणाला सुसू आली शरद पवारांमुळे, या सर्वात शरद पवारांचा काय संबंध उगाच त्या भिष्म पितामहाचे नाव घेतात, तुम्ही टेंन्शनमध्ये आहात तुम्हाला माहित आहे, सर्वोच न्यायालयाच्या निकालातून आपली सुटका नाही. जर डिस्कोलिफिकेशन झालं तर राज्यातील जनता आपल्याला कधीच स्वीकारणार नाही’, असा घणाघात आव्हाडांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page