
रायगड – तेलंगणा राज्यातील यशस्वी घोडदौडीनंतर तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षाने महाराष्ट्रात आपला विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.महाराष्ट्रात सुरू असलेल्या संगीतखुर्चीच्या राजकारणाला जनता कंटाळली असून, सर्वच पक्षांना बाजूला ठेवून भारत राष्ट्र समिती कडे लोकांचा कल आता दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून रायगडच्या प्रत्येक मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती मधे प्रवेश करीत आहेत.
नुकत्याच पेण येथे झालेल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात याची प्रचिती आली. भारत राष्ट्र समिती ( BRS ) पेण मतदारसंघाचे नेते श्री. राम पाटील (फोन 8149788119 ) यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाचे मुंबई व कोकण विभाग समन्वयक श्री. विजय मोहिते यांच्या उपस्थितीत पेणमधील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आणि भारत राष्ट्र समिती घराघरात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमात विभागीय समन्वयक श्री विजय मोहिते ( फोन 9860553053 ) यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि पुढील वाटचालीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि रायगडच्या जनतेला BRS मधे प्रवेश करण्यासाठी जाहीर आवाहन केले.या प्रसंगी भारत राष्ट्र समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. महेश खडे ( फोन 8605250567 ) हे उपस्थित होते.