हे स्वत: विझले आहेत! हे काय पेटवणार पेटवायला माचिस तरी आहे काय?निलेश राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

Spread the love

घर चालवायचं कसं हा प्रश्न उद्धव ठाकरे समोर आहे

⏩राजापूर/प्रतिनिधी :- राजापूर तालुक्यात बारसूत रिफायनरी व्हावी म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पत्र दिले आणि आता हे कोकण पेटवण्याची भाषा करताहेत, हे स्वत: विझले आहेत, यांच्याकडे माचिस आहे आहे का? हे काय पेटवणार? पेटवायला आहे कोण? यांच्या काड्या विझलेल्या आहेत. उद्धव ठाकरे याला कोकणाशी काही देणेघेणे नाही. हा ढोंगी आहे. याला केवळ पैसा हवा. घर चालवायचं कसं असा यांना आता प्रश्न पडला आहे. पैशासाठी याने आधी पत्र दिले आणि आता हाच माणूस पैशासाठी विरोध करत असून गरज पडल्यास कोकण पेटवण्याची जाहीर भाषा करत आहे, यांची नियत काय आहे ते दिसत आहे, कोकणातील जनता सुज्ञ आहे, यांना आता कोकणार कोणीही थारा देणार नाही, अशा कठोर शब्दांत भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.

▶️ बारसूत रिफायनरीला विरोध करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सरकारने हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. यावर निलेश राणे सडेतोड प्रत्युत्तर दिले.

▶️ ‘भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. या मागणीसाठी व या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्यासाठी शनिवारी ६ मे रोजी राजापुरात भव्य रिफायनरी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

▶️ भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात निघालेल्या समर्थन मोर्चात आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू, रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे नेते हनिफ मुसा काझी यांच्यासह सर्वपक्षीय समर्थक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page