राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून 47 लाख 60 हजार लंपास…

Spread the love

राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार लंपास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील बँकेतून चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे.ही सर्व खाती कोलकाता येथील असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते.

एका महिन्यात अशा प्रकारची दुसऱ्यांदा घटना घडत असून निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. सध्या आचारसंहिता लागू असून अधिकारी वर्गाकडेच राज्याचा कारभार सुपूर्द आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page