दिवा भाजपा महिला मंडळ अध्यक्षांची
पदावरून पायउतार ; दिव्यात भाजपची ज्योत विजणार का?

Spread the love


ठाणे : निलेश घाग काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने दिव्यातील रोहिदास मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेतली आहे. त्यांच्या सहकारी म्हणून खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्योती पाटील यांना महिला मंडळ अध्यक्ष पदावरून पायउतार करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यात पुन्हा एकदा भाजपमध्ये बंडाळी माजण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तविण्यात येत आहे. एकूणच आता भाजप दिव्यामध्ये नावालाच शिल्लक राहणार की काय, अशी दिवा शहरात चर्चा जोर धरू लागली आहे.


■ दिव्यात भाजपला मागील दीड-दोन वर्षापासून खिंडार पडत चालले असल्याचे चित्र आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी भाजपमध्ये असलेले निलेश पाटील आणि आदेश भगत यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.


■ त्यानंतर त्यांच्या खांद्यावरील नेतृत्वाची जबाबदारी रोहिदास मुंडे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आणि त्यांनी जबाबदारी पार पाडली म्हणून मुंडे यांना मंडळ अध्यक्ष केले होते. त्यांनी आपल्या सहकारी ज्योती पाटील यांच्यासमवेत दिव्यात भाजप ज्वलंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page