आमदार भास्कर जाधव यांचे काय ते बारामती मधून देखील निवडणूक लढवतील-
पालकमंत्री उदय सामंत

Spread the love

चिपळूण: आमदार भास्कर जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधून देखील निवडणूक लढवतील.मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. भाषण काय मीही करतो, त्यामुळे बोलायला काय जाते? प्रत्यक्षात जनता ठरवते, कोणाला विजयी करायचे ते. लोकशाहीत ज्यांच्या नशिबात असते तोच विजयी होतो, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाचा समाचार घेतला.
आता अजित पवार राष्ट्रवादी गट सत्तेत सहभागी झाला आहे. आमच्याबरोबर भाजपा, राष्ट्रवादी गट, आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल. आमच्या नेत्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. त्या त्या ठिकाणची ताकद आणि स्थिती याची नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.
आमदार जाधव यांच्या वक्तव्यांवर ते म्हणाले, ते कुठून निवडणूक लढवतील हे तेच ठरवतील. आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. आमदार जाधवांनी बारामती, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांचा तो अधिकार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page