
दिवा : प्रतिनिधी दिव्यात गटारांचे योग्य नियोजन, साफसफाई व नालेसफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात दिव्यातील
नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.ओंकार नगर, धर्मवीर नगर, गणेश नगर, विकास म्हात्रे गेट या भागात जास्त करून चाळी आहेत. तसेच तेथे मोठ्ठे दोन नाले आहेत. थोड्याच पावसात येथे पाणी भरते.

अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे, अशा स्थितीत कोणत्याही
दुर्घटना घडू नयेत यासाठी पालिकेने गटारांची व नाल्यांच्या
साफसफाई लक्ष देऊन पूर्ण करून घ्यावीत, असे दक्ष नागरिक
सांगत आहेत.दिव्याच्या विकासाचा दावा करणाऱ्यांची पोलखोल आणि दिव्यातील नालेसफाईची पोलखोल या वर्षी पहिल्या पावसानेच केली आहे, असे मत भाजप दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले.