
उत्सव श्रध्देचा, महिमा भक्तीचा, चला मग येताय ना…..
कर्जत : सुमित क्षीरसागर कोकणातील चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र दहिवली बुद्रुक येथील ग्रामदेवता श्रीमुखौ वरदान-मानाई देवीची त्रैवार्षिक समायात्रा दि. २३ ते २५ जानेवारी दरम्यान होत आहे. दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळ, मुंबईतर्फे आयोजित ‘या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शैक्षणिक सामाजिक आणि क्रिडा श्रेत्रात अग्रेसर असलेले दहिवली बुद्रुक हे गावं, चिपळूण पासून अवघ्या १७ कि.मी आणि सावर्डे पासून हाकेच्या अंतरावर आहे, गावात जाण्यासाठी चिपळूण दहिवली एस.टी सेवा तसेच दहिवली रिक्षा सेवा उपलब्ध आहे. खासगी वाहनाने थेट मंदिराजवळ जाता येते. मंदिर परिसराचे विलोभनीय दृश्य आपले लक्ष वेधून घेते. डोंगराच्या सानिध्यात असल्याने घनदाट झाडी थंडगार आंनदी वातावरण असे निसर्गाचे वरदान गावाला लाभले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर प्रसन्नता आणी मन: शांती लाभते. संपूर्ण भारतात अंतत्य दुर्मिळ अशा त्रिमुखी वरदान देवीच्या आणी त्रिगुणातील मानाई देवीच्या मुख मंडळावरील रूप प्रसन्न व लोभसवाणे आहे. डोंगरात वसलेली शक्ती स्वरूप, विंद वासेनी अधिशक्ती पुढे वरदाण म्हणून प्रचलित झाली आहे. त्रिमुखी वरदान देवी भक्तांना वर देते आणि मानई देवी ते मान्य करून पूर्णतःवास नेते. भक्तांच्चा नवसाला पावणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे जागृत देवस्थान असा भाविकांचा विश्वास आहे.
यात्रेचे अवचित्या साधून शालेय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यसनमुक्ती मार्गदर्शन,नेत्राचिकित्सा, कारणचिकिस्था,मोफत चष्मे वाटप, आरोग्य तपासणी आणी शेती विषेयक मार्गदरनेच अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दहिवली बुद्रक ग्रामस्थ प्रगती मंडळ,मुंबई आणी स्थानिक ग्रामथांच्या नियोजना अंतर्गत ३ दिवस आयोजित करण्यात आले आहे. अधिक मास असेल त्या वर्षी ही समायात्रा पौश पौर्णिमेच्या २ दिवस आधी सुरु होते आणी पौश पौर्णिमेला यात्रेची सांगता होते. या वर्षी २३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत ही यात्रा संपन्न होत आहे.
चला तर जाणून घेऊया…..लाट चढविणे म्हणजे काय.
आईन जातीच्या सरळ झाडाची साल काढलेल्या खोडाला “लाट” असे संबोधले जाते, ही लाट साधारण पणे ५० फूट लांबीची असते. गावातून नाचवत, ठिकठिकाणी पंचारतीचा स्वीकार करत सर्व ग्रामथांचा मदतीने, गुलालाचे उधळण करत ढोलताशा आणी सनईच्या गजरात पवित्र लाटेचे आगमन ग्रामदेवतेच्या मंदिरा समोरील प्रांगणात होते. मंदिरा समोर २५ फूट उंचीच्या सागवानाच्या कायमस्वरूपी उभ्या असलेल्या लाकडी खांबावर केवळ मनुष्य बळाने तोलून ही लाट बगाडाच्या खोबनीत बसवली जाते. याला लाट चढवणे असे म्हणतात. लाटेच्या दोन्ही टोकांना मजबूत दोरखंड बांधून पौर्णिमेच्या दिवशी ढोल सणाईच्या गजरात प्रथम मानकरी आणी नंतर भक्तगणांना दोरखंडावर चढवून कायमस्वरूपी उभ्या असलेल्या खांभाभोपती गोलाकार फिरवले जाते. समायात्रा ही दहिवली गावाची शतकानु शतके चालत असलेली एक दैदिप्यामान परंपरा आहे. तसेच गावाच्या एकात्मातेचे प्रतिक आहे. या ३ दिवसाच्या कार्यक्रमची सांगता डफावर थाफ मारून, देवीचे गुणगान गाऊन केली जाते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी महाप्रसादचे आयोजन केले जाते. हजारो भाविक महाप्रसादचा लाभ घेतात. विधियुक्त देवी उपासनेचे कार्यक्रम मानकरी, गुरव, आणी ग्रामस्थांच्या देखरेखी खाली केले जातात. वरदान मानाईच्या कृपादृष्टी होण्यासाठी सर्व ग्रामस्थ देवीची मनोभावे सेवा आणी प्रार्थना करतात, देवीचे आशीर्वाद घेऊन, सुविचाराचे सदाचाराचे सोने वाटून समायात्रेची सांगता केली जाते.
जाहिरात

जाहिरात



