समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात बसरा स्टार जहाजाचे दोन तुकडे…

Spread the love

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाचे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे झाले. आज मंगळवारी  जहाज अडकून पाच वर्षे पूर्ण होत  आहेत.
     

किनारा सुरक्षिततेच्यादृष्टीने जहाज काढण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले प्रयत्न तोकडे पडले होते. ३५ कोटींचे हे महाकाय जहाज समुद्राच्या खाऱ्या पाण्याने आणि लाटांच्या माऱ्याने सडले होते. अवघ्या दोन कोटींमध्ये ते भंगारात काढले जाणार आहे; बसरा स्टार जहाज ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरून ठेवण्यात आले होते; मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. हे जहाज  काढण्यासाठी आता एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्याला ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये हे जहाज सडले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page