कशेळी ते पूर्णगड अशी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Spread the love


Ratnagiri: अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात नाटे पोलिसांनी धडक कारवाई करताना याप्रकरणी कशेळी ते पूर्णगड अशी अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले आहे.जिल्हा पोलिस अक्षिक धनंजय कुळकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलिसांनी सायंकाळी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित चेतन सुरेश यादव (रा. राजापूर, रत्नागिरी) आणि रंजन शंकर खानविलकर (रा. राजापूर, रत्नागिरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटकही केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली दरम्यान, या कारवाईमध्ये सुटका करण्यात आलेली पाचही जनावरे नाटे पोलीस ठाणे मार्फत एका शेतकरी कुटुंबातील गुरांच्या गोठ्यामध्ये तात्पुरता चारा व निवारा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे स्तरावर जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून जाणार्‍या कशेळी ते पूर्णगड या सागरी महामार्गावर सायंकाळी 4 वा ते 8 वा. च्या दरम्यान नाटे पोलीस पथकाद्वारे वाहन तपासणी करण्यात येत होती. तेवढ्यात समोरून एक वाहन ज्याचा हौदा हा एका काळ्या प्लॅस्टिक कापडाने झाकलेल्या व बंद स्थितीत दिसून आला.यावेळी तपासणी करीता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या पथकाला या वाहनाचा संशय आला. त्यांनी लागलीच या वाहनाला थांबविले आणि वाहनावर झाकलेले कापड काढून आतमध्ये खात्री केली असता त्यांना या वाहनामध्ये पाच जनावरे निर्दयतेने कोंबून भरलेले दिसून आले. त्यानंतर, या पोलिस पथकामार्फत गाडीमध्ये असलेल्या पाचही जनावरांची सुटका केली
ही कारवाई नाटेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदारी यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल सागर कोरे, दिगंबर ठोके, किरण जाधव, सागर गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page