माहेर संस्थेतील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल…

Spread the love

रत्नागिरी: निवळी हातखंबा, रत्नागिरी येथील माहेर संस्था या मुलींच्या बालगृहातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १२ जून २०२५ रोजी दुपारी अंदाजे ३.३० वाजण्याच्या सुमारास, संस्थेमध्ये पालनपोषणासाठी दाखल असलेल्या कु. पुनम अनिल कांबळे (वय १५ वर्षे) आणि कु. प्रिती रवि बनसोडे (वय १७ वर्षे) या दोघी मुली संस्थेच्या कंपाउंडजवळ असलेल्या नळावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान, अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन वयाचा गैरफायदा घेत त्यांना संस्थेच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025, भादंवि कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वरील दोन मुलींविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे (फोन – 02352-230133 / मोबाईल – 9321211516) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
सूचना देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page