
रत्नागिरी:- जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळून पाच झोपड्या मलब्याखाली गाडल्या. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये आशा अमर राठोड (वय ४२), मोहन किसन राठोड (वय २), रोहन जाधव (वय १७) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण तसेच तलाठी वैभव शेंडे यांनी धाव घेतली. जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.