मंडणगडमधील भोळवली धरणाला कोणताही धोका नाहीकार्यकारी अभियंता गणेश सलगर

Spread the love


रत्नागिरी; मंडणगड मधील लघु पाटबंधारे योजना भोळवली धरणाच्या प्रथम दर्शनी गळतीचे प्रमाण पहाता धरणास कोणताही धोका संभवत नाही. धरण पाणी पातळी कमी झाल्यानंतर गळतीचे ठिकाण निश्चित करुन उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली.
हे धरण मातीचे असून त्याची लांबी 490 मीटर इतकी आहे. या धरणाचा प्रकल्पीय पाणी साठा 5.618 दलघमी असून धरणाच्या सांडव्याचे बांधकाम झाले नसल्याने धरणामध्ये 125.80 मीटर तलांकापर्यंत 3.606 दलघमी (64 टक्के) इतका पाणी साठा होत आहे. 26 जुलै रोजी ग्रामस्थांच्या समवेत धरणाची पाहणी केली असता धरण पाणी पातळी 126.55 मीटर इतकी असताना तलांक 115.50 मीटरमध्ये गळती निदर्शनास आली. मागील दोन हंगामामध्ये धरणाच्या उर्ध्व बाजूस गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली असून चालू हंगामामध्ये धरणाच्या खालील बाजूस इर्न्व्हटेड सँड फिल्टरचे काम सुरु आहे.
सद्यास्थितीत धरण सांडव्यातून 6.982 क्युमेक्स इतका विसर्ग सुरु आहे. धरणातील गळतीची पातळी निश्चित करण्याकरिता विमोचकातून 2.20 क्युमेक्स विसर्ग सुरु करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या समवेत विठ्ठल मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी धरणावरती पूर्ण वेळ कर्मचारी ठेवण्याची मागणी करण्यात आली. सद्यास्थितीत धरणावरती हंगामी दोन पाळीमध्ये कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तथापि, ग्रामस्थांच्या मागणीनुसार पावसाळा कालावधीकरिता अन्य दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामामुळे धरणातील गळतीचे प्रमाण मागील हंगामापेक्षा कमी झाल्याचेही काही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. प्रथम दर्शनी गळतीचे प्रमाण पहाता धरणास कोणताही धोका संभवत नाही.धरण पाणी पातळी कमी झाल्यानंतर गळतीचे ठिकाण निश्चित करुन उपाययोजना करण्यात येईल, असे प्रसिध्दीप्रत्रकात म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page