
दिल्ली- मेरी माटी मेरा देश अंतर्गत देशभरात जमाविलेले मातीचे कलश दिल्ली येथे एकत्र करून अमृत कलश सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील युवा मोर्चाचे कार्यकर्ते दिल्ली येथे जात आहेत. त्याच अंतर्गत युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे राज्यभरातील पदाधिकारी दिल्ली येथे रवाना होत आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधून ( उत्तर व दक्षिण ) अमृत कलश यात्रेसाठी संगमेश्वर युवा मोर्चा दक्षिण अध्यक्ष प्रथमेश सुनील धामणस्कर , संगमेश्वर उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील संजय ( बापू ) सुर्वे, युवा मोर्चा सरचिटणीस किशोर दत्ताराम करंबेळे, उपाध्यक्ष मयूर आत्माराम नटे, दक्षिण उपाध्यक्ष शेखर काशीराम गुरव,युवा मोर्चा उत्तर सदस्य मंदार मोहन रहाटे अशी संगमेश्वर तालुका मधील युवा मोर्चा ची टीम दिल्लीकडे कार्यक्रमा साठी मध्ये दाखल झाले आहेत.
जिल्हा भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश जी सावंत,संगमेश्वर उत्तरं तालुका अध्यक्ष विनोदजी म्हस्के, संगमेश्वर दक्षिण तालुका अध्यक्ष रुपेशजी कदम यांनी युवा मोर्चाच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.