दंगली महाराष्ट्रातील गावोगावात पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे – अंबादास दानवे

Spread the love

छत्रपती संभाजीनगर – कोल्हापूरात झालेल्या हिंसाचारानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. अशात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र डागत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी, ‘महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दंगली होतात म्हणजे संभाजीनगर येथे झालं, शेवगावात झालं, अकोल्यात झालं, आता कोल्हापूरात झालं, ग्रामीण भागात संगमनेर ठिकाणी सुद्धा दंगल घडलेली आहे आणि या दंगली महाराष्ट्रातील गावोगावात पोहोचण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. ज्या प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारने प्रभाव टाकू शकले नाही. काम करू शकले नाहीत, जनतेला सांगण्यासाठी काही मुद्दे यांच्याकडे नाहीत. म्हणून धर्माधर्मात दंगल घडवण्याचे काम सत्तेतले मंडळी करत आहेत,असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page