बावनदी निवळी येथील झालेल्या अपघात, विष्णू पवार आणि ग्रामस्थ यांच्या मागणीची घेतली राष्ट्रीय महामार्गाने दखल, दबाव ने लावून धरलेला विषय राष्ट्रीय महामार्गाने केला मान्य…

Spread the love

रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी मधील बावनदी येथे गॅस टँकर आणि मिनी बस मध्ये झालेल्या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले होते. सदर अपघातामध्ये 18 तासाहून अधिक काळ राष्ट्रीय महामार्ग बंद होता. राष्ट्रीय महामार्ग यांनी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या स्थानिक लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्रचंड मोठा अपघात घडला होता. सदर बातमीच्या वेळेला जनशक्तीच्या दबावने प्रथमच आमचे प्रतिनिधी दिनेश आंब्रे यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली होती. सदर बातमीच्या वेळेला स्थानिक ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी विष्णू पवार यांनी आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाला प्रत्येक वेळेला सुचित करण्यात आलेले होते की रत्नागिरी कडून मुंबईकडे जाताना तीव्र उतारा वरती गाडी कंट्रोल होत नाही. त्यामुळे स्पीड ब्रेकर व फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली होती. रस्ताही करण्याची मागणी ग्रामस्थांची होती. समाज माध्यमांमध्ये एकमेव बातमी जनशक्तीच्या दबावने लावली होती.

सदर बातमीची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी आणि कॉन्ट्रॅक्टरने सदर अपघात ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहेत. तसेच फलकही लावण्यात आलेले आहेत. रस्ताही करण्यात आलेला असून नागरिकांच्या मागणी प्रमाणे राष्ट्रीय महामार्गाने गांभीर्याने उपाययोजना केलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नसते तर आज एवढा मोठा अपघात घडला नसता असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जनशक्तीच्या दबाव चे मानले आभार…

जनशक्तीचा न्यूज परिवाराचे विष्णू पवार आणि त्यांच्या सहकारी असे स्थानिक नागरिकांनी आभार मानलेले आहेत. स्थानिक लोकांची मागणी आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम दबाव परिवाराने वारंवार केलेले आहे. मुंबई गोवा हायवे लवकर व्हावा म्हणून जनशक्तीच्या दबाव चे संपादक व संचालक गणेश पवार यांनी आमरण उपोषण केले होते. व आज रोजी ते सदर हायवे संदर्भामध्ये पाठपुरावा करत आहेत. त्याबद्दलही विष्णू पवार व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गणेश पवार यांच्या अभिनंदन करण्यात आलेले आहे. दिनेश आंब्रे दबाव परिवाराचे प्रतिनिधी यांचे यावेळी आभार मानण्यात आलेले आहेत.

“मुंबई गोवा हायवे वरती बावनदी येथे झालेल्या अपघाताची दखल राष्ट्रीय महामार्गाने घेतलेले असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांचे आम्ही सर्व ग्रामस्थ आणि मी आभार मानत आहोत आमच्या मागणीचा विचार करून सदर ठिकाणी अपघात प्रणव क्षेत्र म्हणून बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच स्पीड बेकर ही लावण्यात आलेले आहेत. रस्ताही करण्यात आलेला आहे. व सदर ठिकाणी प्रोटेक्शन साठी साईड गार्ड ही बसवण्यात आलेले आहेत. हीच दखल राष्ट्रीय महामार्गाने अगोदर घेतली असती तर एवढा मोठा अपघात घडला नसता असे मला वाटते. जनशक्तीच्या दबाव परिवाराने आमची मागणी राष्ट्रीय महामार्ग आणि प्रशासनामध्ये पोहोचवण्यामध्ये मोलाचे योगदान केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. दबाव परिवार करत असलेल्या हायवे संदर्भाच्या पाठपुराव्यासाठी आमचा त्यांना सदैव पाठिंबा असेल.”- विष्णू पवार प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना भटके विभक्त प्रदेश कमिटी महाराष्ट्र…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page