पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता अखेर सुरू;

Spread the love

पुणे: पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शुक्रवारपासून (दि. २५) भोर हून महाडकडे जाणारा वरंध घाट सर्व वाहनांसाठी सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तसे आदेश सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. अतिवृष्टीच्या काळामध्ये घाटामध्ये अनेकदा अचानक दरड कोसळणे, भराव वाहून जाणे आदींमुळे जीवित व वित्त-हानीच्या घटना घडलेल्या आहेत

हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या रेड व Orange अॅलर्टमुळे २२ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी घाट बंद ठेवण्यात आला होता. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून, अतिवृष्टीबाबत अंदाज नसल्याचा अहवाल प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. दरम्यान, घाट बंद केल्यापासून नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, स्थानिक रहिवासी यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

दरम्यान, शिरवळ जवळील शिंदेवाडी ते भोर मार्गे वरंध घाटापर्यंत ७० किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्याची निविदा काढण्यात आली आहे. वरंध ते राजेवाडी या मार्गाचे काम सुरू असून शिंदेवाडी ते वरंध घाट आणि पुढे राजे वाडीपर्यंत सुमारे ९२ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सुमारे ८५० कोटी रुपयांच्या खर्चाचे काम आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page