
नेरळ- सुमित क्षीरसागर ,कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या चांदई उल्हासनदी पुलाजवलील गणेश विसर्जन ठिकाणी चार जण बुड्याल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी घडली होती.या घटनेतील एक तरुण बचावला होता तर मुलाचा आणि वडिलांचा असे दोघांचे मृतदेह पाण्यात सापडले होते.परंतु चेतन सोनावणे या तरुणाचा शोध लागला नव्हता दरम्यान आठव्या दिवशी या तरुणाचा मृतदेह नेरळ धमोते येथे उल्हासनादीच्या किनारी स्थानिकांना सापडून आला. अनंत चतरुदर्शीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून उकरूळ ग्रामपंचायत हद्दीतील म्यापल ग्रीन येथे राहणारे चेतन सोनावणे आणि त्याचे कुटुंब सोबत स्थानिक रहिवाशी आणि पुणे येथील मित्र जगदीश साहू व मुलगा यश जगदीश साहू हे चांदई येथील उल्हासनदीवर गेले होते.

गणेश मूर्ती बुडवत असताना चार जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती,त्यात एका तरुणाला त्याच्या वडिलांनी वाचवले होते,तर यश साहू या तरुणाचा मृतदेह त्याच दिवशी स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढला होता.तर बाकी तरुणाचा शोध घेण्यासाठी खोपोली येथील गुरुनाथ साठेलकर यांची अपघात ग्रस्त सामाजिक टीम ही देखील घटनास्थळी दाखल झाली होती.अखेर जगदीश साहू या 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अपघात ग्रस्त टीमने अथक प्रयत्नाने शोधून काढला होता.तर बुडालेल्या चेतन सोनावणे या तरुणाचा कुठेच शोध लागत नव्हता, गेली पाच दिवस नदीच्या पाण्यात अपघात ग्रस्त सामजिक टीम शोध घेत होती तर पोलीस प्रशासन,महसूल विभाग अधिकारी,कलेक्टर स्थानिक प्रशासन हे सर्वच कामाला लागले होते,अखेर आज आठव्या दिवशी चेतन सोनावणे या तरुणाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणापासून आठ ते दहा किलोमीटर असलेल्या अंतरावर नेरळ कोल्ह्यारे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या धामोते येथील धनेश्वरी जवळ उल्हासनदीच्या किनारी येथील मासे पकडणाऱ्या तरुणांना पाण्यावर तरंगताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आढळून आला.
घटनास्थळी अपघात ग्रस्त सामजिक टीम तसेच कर्जत,नेरळ पोलीस हजार झाले होते.तर स्थानिकांनी एकाच गर्दी केली होती.आठ दिवस चेतनचा मृतदेह हा पाण्यात राहिल्याने फुगून सडलेल्या अवस्थे सारखा झाला होता.मृतदेह पाण्याबाहेर काढून तुंगेकर यांच्या शववाहिनीतून हा मृतदेह कर्जत उपजिल्ह्या रुग्णालय शवविच्छेदन ठिकाणी नेण्यात आला होता.
दरम्यान उपस्थित अपघात ग्रस्त सामजिक टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणालाही पोहता येत नसेल तर नदीच्या पाण्यात उतरू नये,नदीचा प्रवाहाची आपल्याला माहीत नसल्याने आणि तेथील जागेची देखील माहीत नसल्याने पाण्यात बुडल्याने अपघात घडत असतात त्यामुळे सोबत पोहणारा असेल तरच पाण्यात उतरावे अन्यथा पाण्यात उतरण्याचा मोह नागरिकांनी अवरावा.