ब्रेकिंग : निवळी येथील अपघातामुळे मुंबई गोवा हायवे 12 तासाहून अधिक काळ तास वाहतूक ठप्प, उक्षी मार्गे वळवली तरीही वाहतूक कोंडी कायम…

Spread the love

अपघातात चिपळुणातील 31 जण जखमी, दोन गंभीर, एकाला कोल्हापूरला हलवले..

रत्नागिरी : आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निवळी येथे झालेल्या बस आणि टँकर अपघातात अद्यापही वाहतूक ठप्प आहे. टँकर मधून गॅस लिकेज होत असल्यामुळे ही वाहतूक थांबवण्यात आली आहे तेरा तासाचा कालावधी होऊ नये गॅसचे शिफ्टिंग चे काम चालू असल्याने सुरक्षिततेच्या अनुषंगाने महामार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे.महामार्ग पोलिसांनी वाहतूक उक्षी मार्गे वळवली आहे. त्यामुळे उक्षी घाटात ही वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांची दमछाक झाली आहे. मुंबई गोवा हायवे चे ट्राफिक अशी मार्गे वळवल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच दोन्ही बाजूची वाहतूक गाड्या परत वळवण्यात आलेल्या असून रस्ता मुंबई गोवा हायवे अजूनही बंद आहे.

12 तासाहून अधिक काळ होऊ नये मुंबई गोवा हायवे ठप्प…

12 तासाहून अधिक काळ होऊ नये तास वाहतूक ठप्प असल्यामुळे वाहन चालकासह प्रवाशी हैराण झाले आहेत. महामार्गावर प्रथमच एवढ्या मोठया वेळेसाठी वाहतूक
ठप्प झाली आहे. 12 वर्षापूर्वी निवळी याच घाटात एस. टी चा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी 6 तास वाहतूक ठप्प होती. त्यानंतर आता 10 तास वाहतूक बंद आहे.अपघाताची भीषणता गंभीर आहे.


सकाळपासून वाहतूक ठप्प झालेली असल्यामुळे 6-7 किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग वाहतूक पोलिसाची यामध्ये दमछाक झाली असून अखेर महामार्ग पोलिसांनी वाहतूक उक्षि मार्गे वळवण्याचा निर्णय घेतला. मात्र उक्षी घाट वळणाचा असल्या मुळे वाहने मोठया प्रमाणात या मार्गावरून जात असल्यामुळे येथेही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्या सोमवारी कामावर जाण्यासाठी वाहन धारकांची चढाओढ दिसत आहे.

प्रवाशांचे प्रचंड हाल, वाहनांच्या लांबच राम रांगा..

अपघातामुळे एसटीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रवासी ताटकळत बसले आहेत. अपघातामुळे गाड्या पुढे पाटी न झाल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झालेले आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून प्रवासी वाहतूक चालू होण्याची वाट बघत आहेत. लोकांच्या मुंबई गोवा हायवे च्या संदर्भ मध्ये समस्त प्रतिक्रिया येत आहेत. आजच्या अपघातातील टँकर मधून गॅस मोठया प्रमाणात लिकेज झाला आहे. या गॅसने पेट घेतला आहे. मात्र उर्वरित गॅस दुसऱ्या टँकर मध्ये भरण्यात येत आहे. मात्र कोणताही अनर्थ होऊ म्हणून ही वाहतूक थोपवून ठेवण्यात आली आहे. मात्र वाहन चालक प्रवासी हैराण झाले आहेत.

गंभीर पेशंटला कोल्हापूरला हलवले, अपघातामध्ये 31 प्रवासी जखमी..

गंभीर जखमींमध्ये मंदा खाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर मीना विनायक शिरकर यांच्या चेहऱ्याला आणि उजवा हात फ्रॅक्चर आहे. त्यांनी परकार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. इतर पेशंटची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.चिपळूण मधील 31 जण जखमी, नावे खालील प्रमाणे संतोष जागुष्टे (28), विराज राजाराम सावंत (41, रा. सावर्डे), मंदार सुखदेव खाडे(53), स्मिता मधुकर पाटील (48), उषा अमोल खुडे (38), जयश्री सुर्यकांत गावडे (54), प्रियंका दिलीप जाधव (38), स्नेहा
संतोष मिस्त्री (47), धर्मेंद्र दत्तात्रय के देरुगडे (53), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे (53), सुलक्षणा संभाजी पाटील (40), निशिकांत दिनानाथ वानरकर (51), रुपाली सुकांत यादव (50), हर्षाली हेमंत पाकळे (36), निता विनायक बांदरे (38), मिना सुभाष घाडगे (52), कमल किशोर महाडिक (37), प्रेमकुमार बबन शिवगण (35), अमोल गणेश
कोनवाल (35), मनिषा संतोष कांबळे (47), मालिनी दिपक
चव्हाण(40), श्वेता संजय चव्हाण (48), राजेश यादव (47),गणेश महादेव सावर्डेकर (45), सुरेंद्र दिपक सावंत (50), सचिन अशोक पोकळे (43),उदय पांडूरंग खताते (52), अरविंद अनंत सकपाळ (57), मिना विनायक शिरकर ( 38 ) आणि रोहित राजेंद्र चव्हाण (35)अशी अपघातामधील 30 जखमींची नावे आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page